कुशिवलीतील जमिनीचा वाद; कब्जेवहीवाटेत असलेल्या जमिनीत बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप

प्रभात पर्व न्यूज - Published: 24-Dec-2024 11:04 am

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथील शेतकरी यशवंत मुका फुलोरे आणि अन्य संबंधित पक्षांमध्ये जमिनीच्या मालकीसंदर्भात वाद उफाळून आला आहे. १९६२ पासून फुलोरे यांच्या कब्जेवहीवाटेत असलेली सर्वे क्रमांक ८२ ब ही जमीन शामसुंदर लक्ष्मण पाटील यांनी सदरउद्दीन बसरखान यांना विकल्याचे समजल्यावर फुलोरे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने मोजणीसाठी परवानगी दिली, मात्र कोणतेही बांधकाम, खोदकाम होऊ नये तसेच मिळकतीबाबात शहानिशा करणे बाकी असून त्यासंदर्भात स्टे ऑर्डर दिली आहे.

पोलीस बंदोबस्तासह उत्खनन :

​​​        २१ डिसेंबर २०२४ रोजी मोजणी अधिकारी आणि तब्बल २५-३० पोलिसांच्या ताफ्यासह मोजणीसाठी आले होते. मोजणी प्रक्रियेत स्थगिती आदेशाचा अवमान करत जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने जमिनीत खंदक खोदले गेले. फुलोरे यांच्या वतीने वकील विजया बाविस्कर यांनी घटनास्थळी पोहोचून न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर केली. मात्र, हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.  

अवैध उत्खननाचा आरोप :

          सदर मिळकतीसाठी ५०० ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी असतानाही सदरउद्दीन बसरखान यांनी ५०,००० ब्रास पेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप फुलोरे यांनी केला आहे. या संदर्भात तहसील कार्यालय अंबरनाथ आणि उल्हासनगर प्रांत कार्यालयात अर्ज दाखल असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.  

शेतकऱ्याची हायकोर्टाची दार ठोठावण्याची तयारी :

     शेतकरी यशवंत मुका फुलोरे यांनी प्रशासन आणि बसरखान यांच्या कारवायांविरुद्ध हायकोर्टात रिट पिटीशन दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारी कार्यालयांनी योग्य कार्यवाही केली नाही तर हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.  


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement